
कर्जत (प्रतिनिधी) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, भारतीय हवामान खात्याने ई-मेल संदेशादारे अहमदनगर जिल्हयात दि. 27 मे 2021 से 30 मे 2021 या कालावधीत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह बीजा पडणे व पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दिनांक 29-30 मे 2021 रोजी जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती घेणे आवश्यक आहे.
उपरोक्त कालावधीत वीजा पडण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.
1. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इ. विद्युत उपकरणे बंद ठेवून खोतापासून अलग करून ठेवावीत.
2. दूरध्वनी व भ्रमणध्वनी चा वापर टाळाया,
3. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
4. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
5. विजेच्या खावापासून लांब रहावे.
6. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
7. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडध्यामध्ये डोके घालून वाकून बसावे,
8. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात,
तसेच या कालावधीत वाहणारा सोसाट्याचा यारा व पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
1. पावसात व सोसाट्याच्या या यात घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा यांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
2. अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व प्रवास करू नका.
3. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
4. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.
5. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफया पसरवू नका,
6. आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांच्या नागरीकांनी जागरूक रहावे व प्रशासनास सहकार्य कराये.
7. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नजिकचे पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय वा जिल्हा नियंत्रण कक्ष क्र. 1077 (टोल फ्री) 0241-2323844 चा 2356940 ला संपर्क करावा.
8. वाहणा-या या यामुळे किंवा पावसामुळे शेत मालाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी य शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवाया. पाळीव प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी तयार करण्यात आलेले शेडची दुरुस्ली व या यामुळे शेडचे पत्रे उडू नये यासाठी दक्षता घ्यावी.
9. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.
10. अतिवृष्टी व सोसाट्याचा वारा वाहत असताना कोणीही पर्यटन स्थळी, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये, 11. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. 12. हवामान विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून जीवित च मालमतेची काळजी घ्यावी.

