कर्जत (प्रतिनिधी) : निसर्ग एकदा चिडला की कुणाचेही ऐकत नाही.भल्याभल्यांना हात टेकावेच लागतात.निसर्गावर मानवाने केलेले अतिक्रमण आता थांबवावे लागेल अन्यथा पुरासारख्या प्रलयांना आपल्याला वारंवार तोंड द्यावे लागेल.आपले आयुष्य वाचवण्यासाठी झाडांची लागवड व वृक्षसंवर्धन करणे खुपच गरजेचे आहे. बाबांनो,आपण मेल्यानंतर आपल्या अंत्यविधीला पुरतील किमान एवढी झाडे तरी प्रत्येकाने लावायला हवीत असे मत कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
करमणवाडी (ता.कर्जत) येथे 'चला समृद्ध गाव घडवूया' संकल्पनेतून घनवन वृक्षलागवड करण्यात आली.या निमित्त त्या बोलत होत्या.गाव हरित करण्यासाठी सध्या या गावातील गट तट विसरून सर्वपक्षीय मंडळी एकत्र आली आहेत हे विशेष.स्व-स्वच्छतेपासुन ग्रामस्वछता,पाण्याची बचत, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे आदी बाबी प्रभावीपणे राबवून ही समृद्ध गाव योजनेतील ही गावे आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहेत.आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून या गावांना शासनाच्या विविध योजना प्राधान्य क्रमाने दिल्या जाणार असल्याचे मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.ववनाधिकारी गणेश छबिलवाड,सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप आदींनीही शासकीय योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना सांगितली. सध्या १ किमी अंतर असलेला धुमकाईफाटा ते खेडरस्ता,करमणवाडी गावठाण ते पावणे वस्ती रस्ता, धार्मिक मंदिरे, शाळा, सार्वजनिक ठिकाणांवर विविध जातींची देशी झाडे लावण्यात आली आहेत.
![]() |
| Adv. |
या कार्यक्रमासाठी सरपंच भरत पावणे, उपसरपंच अनिता खराडे, माजी सरपंच अंकुश बनसोडे,ग्रामसेवक हनुमंत गदाडे,वनाधिकारी गणेश छबिलवाड,सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप,वनपाल रमेश पवार,वनरक्षक सुरेश भोसले,वनरक्षक दिपक गवारे,वनमजुर विठ्ठल गवळी,ग्रा. पं. सदस्य अनिल वायसे,किसन पवार, सुनिल खराडे तसेच गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामरोजगार सेवक गणपत सायकर यांनी मानले.
हिवरे बाजारची जागा आपण का घेऊ शकत नाही?
'देशभरात हिवरेबाजारचे नाव घेतले जाते ते कशामुळे?तेथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी स्वतःला गाव विकासात झोकून देऊन सर्वोच्च काम केले.सार्वजनिक ठिकाणी अकारण गर्दी करणाऱ्या लोकांनी गट तट विसरून रोज थोडे श्रमदान केले तर आपलीही ओळख व्हायला वेळ लागणार नाही'.असेही सुनंदा पवार म्हणाल्या



